Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
सहकार म्हणजे एकत्र, बरोबर काम करणे, निकोप, निरोगी समाजरचना, प्रामणिक, निस्वार्थ तळमळीच्या सहकार्यातूनच निर्माण होईल.
समाजातील विविध घटकांचे एकमेंकांशी बरोबरीच्या नात्याने परस्परांच्या उन्नतीसाठी प्रामणिक साहचर्य ही सहकारातील प्राथमिक आवश्यकता आहे.
वास्तविक भारतात सहकाराचा मंत्र नवा नाही. आपल्या प्राचीन श्रृषिमुनींनी सहकाराने आम्ही कोणति किमया करू हे आम्हाला सांगितले. सहकार व समाज हे अविभाज्य शब्द होत, समाजात सहकार नसेल तर समाज राहूच शकणार नाही.
सहकारी कार्याची आवश्यकता वास्तविक समाजातील सर्व थरास असते. पण समाजातील दुर्बल घटकांसाठी त्याची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते. उदाहरणार्थ एखादा गरीब शेतकरी आपल्या जमिनीची उत्तम रीतीने मशागत करून त्यात अधिक पीक काढण्याची त्याची प्रबळ इच्छा असते. परंतु साधने व भांडवल यांचे अभावी ते करण्यास त्याला अनंत अडचणी येतात. नांगरटीसाठी त्याच्याकडे एकच बैल आहे. दुसरा शेतकरी आहे त्याचेकडेही एकच बैल आहे त्याचीही आपल्या शेतात चांगले भरपूर उत्पादन काढण्याची तळमळ आहे. हे दोन शेतकरी सहकार करून एकमेकांचे बैल आपआपल्या शेतीसाठी वापरून आपला कार्यभाग तर पूर्ण करतीलच परंतु आपले उत्पादन कमी खर्चात करतील. कारण दोन बैल प्रत्येक शेतकऱयाला बारा महिने पोसणे जड जाते, त्याऐवजी एक बैलात प्रत्येकाचे काम भागते.
चार - पाच शेतकऱयांना मिळून एक विहीर खणावयाची आहे. कोणाकडेही मजुरी देण्यासाठी भांडवल नाही. अशा वेळी ती विहीर शेतकरी व त्याची घरची माणसे श्रमसहकार्याने पुरी करू शकतील. सर्व मिळून ती योग्य खर्चात बांधू शकतील व सर्वजण त्या विहिरीचे पाणी सर्वांच्या शेतासाठी आळीपाळीने वापरू शकतील.
एकमेकांवर कुरघोडी करून पिळवणुक करण्याच्या इच्छेने कार्य करणाऱया कोणत्याही व्यक्ती सहकारास अपायकारक ठरतात.
सहकारात केवळ भांडवलाचा सहकार करावयाचा नसून श्रम सहकार करण्याचीही आवश्यक आहे. तरच तो यशस्वी होईल.
सहकाराचा व्यवहार तोट्याचा असता कामा नये. कारण, एकमेकांच्या भांडवलाच्या श्रमाच्या सहकाराने कोणताही व्यवहार काटकसरीने झाला पाहिजे. असा सर्वसामान्य सिध्दांत आहे. सहकाराचा व्यवहार तोट्यात होण्याची कारणे सहकारासंबंधी उदासिनता, श्रमचुकार व केवळ स्वतचा स्वार्थ साधण्याच्या प्रवृत्ती यातच आढळतात. निर्धनाने, अपुरे भांडवल असणाऱया व प्रामणिक व श्रम करणाऱयांना सहकार मंत्र हा संजीवन देणारा मंत्र आहे.

सहकार संस्था व कंपनी कायद्याने स्थापन झालेली संस्था जेव्हा व्यवसाय करतात तेव्हा दोन्ही संस्थांची उद्दिष्ठे आपण करीत असलेल्या आपल्या व्यवसायात नफा मिळवणे असेल, परंतु सहकारी संस्थेचा उद्देश त्याहून काही अदिक असतो. सहकारी संस्थां समाजाचे आपल्या नफ्यासाठी शोषण न करण्याच्या वृत्तीने काम करते, तसे तिने केले पाहिजे तरच सहकारि चळवळ सर्वांची उन्नती करील.

सहकारी संस्था ज्या प्रसंगी मध्यस्थाचे काम करीत असते, त्यावेळी उत्पादकास वाजवी भाव मिळवून देणे हेही तिचे कर्तव्य असते. थोडक्यात सेवा बुध्दीने, समाजाचे अहित न होता कार्य करी राहणे हा सहकाराचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीचा हितसंबंधासाठी दुसऱयाची पिळवणुक करू शकते, सहकारात हे होवू नये.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved