फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
|
व्यक्तीच्या भौतिक प्रगतीची वाढ सहकाराच्या खऱयाखुऱया आचरणाने होईल. तशी नैतिक पातळीही निश्चितपणे उंचावेल. भौतिक समृध्दीची वाटचाल करणारी व्यक्ती नैतिककडे लक्ष देतेच असे नाही, किंबहुना त्याकडे ती दुर्लक्षच करते. परंतु ‘सहकार’ मार्गाचा अवलंब करताना सेवाभावाचे पथ्य कटाक्षाने पाळावयाचे असल्याने, सहकारी वृत्ती बाणावयाची असल्यामुळे तसेच आपली प्रगती करून घेत असता कोणीही दुर्बल व्यक्तीचे अपहरण करीत नाही ना याचा सदैव विचार करावयाचा असल्यामुळे भैतिक समृध्दीतेबरोबर नैतिक पातळीही उंचावेल, अर्थात सहकारात कार्य करणाऱया सर्व व्यक्तींनी याचे यथोचित पालन केले तरच ते शक्य आहे, नाही तर खाजगी भांडवलदारांऐवजी सहकाराच्या गोंडस नावाखाली नव्या भांडवलदारांचा वर्ग समाजावर कुरघोडी करणारा उभारला जावयाचा, कधी कधी ती भिती उत्पन्न होते म्हणून शासन निर्बंध घालते. |
|
भारतासारख्या गरीब देशातील दुर्बल समाजाने आपली प्रगती करून घेण्यासाठी सहकारी कास धरणे जरूर आहे. ती काळाची गरज आहेे. |
|
‘सहकारी चळवळ’ ज्या तत्वावर आधारलेली आहे त्या तत्वांची कल्पना आल्यानंतर सहकारी तत्वावर कार्य करणाऱया व्यक्ती एकत्र येऊन कार्य करणाऱयास प्रारंभ केल्यानंतर त्याचे अस्तित्व कायद्याने मानले पाहिजे. म्हणून सहकार संस्था अधिनिमात तशी तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम हा महाराष्ट्र राज्यासाठीचा कायदा आहे. कंपनी कायदा याचा चेहरामोहरा कधी कधी एकसारखा वाटला तरी कंपनी कायद्यातील हा केंद्रीय भारत सरकारचा कायदा आहे. कोणत्याही तरतुदी या कायद्यानुसार स्थापन झालेल्या सहकारी संस्थेस लागू होत नाहीत असे त्या कायद्याच्या १६७ व्या कलमात सांगितले आहे. |
|
तसेच केंद्र सरकारचा सहकारी कायदा आहे, पण जेव्हा एखादी सहकारी संस्था आंतरराज्य व्यवहार करते (inter state) त्यावेळी तो कायदा अंतरराज्यीय संस्थांना लागू होण्याचा प्रश्न येतो. आपल्या राज्यापुरते कार्यक्षेत्र असणाऱया सहकारी संस्थांना तो लागू होत नाही.ागते. |
|
सहकारी चळवळीची वाढ वेगाने होत आहे. ज्यावेळी एखाद्या चळवळीची वाढ वेगाने होते त्यावेळी त्यात चांगल्याबरोबर वाईट प्रवृत्तीही शिरतात. सहकारात वाईट प्रवृत्तीची वाढ ही सहकारी चळवळीला लागलेली किड आहे, त्यामुळे ती बदनाम होऊ लागली आहे. वास्तविक सहकारी चळवळ राजकारणांपासून संपूर्णपणे दूर असली पाहिजे. |
|
सहकारी चळवळीने सामाजिक कार्य करून सहकारी कार्यपध्दतीत आपली उन्नती, प्रगती करून घेता येते हे सर्व वैचारिक व्यक्तींनी जी सहकार क्षेत्रात शिरतात त्यांनी सदैव ध्यानात ठेवावया हवी. |
|
सहाकरी चळवळ ही वास्तविक उस्फूर्त चळवळ असावी, ही चळवळ व्यक्तीची व त्याबरोबरच समाजाची चळवळ असावी. ज्याप्रमाणे तत्वत कायद्यासमोर सर्वांना समान लेखले जावेत असा उद्देश असतो आणि त्याप्रमाणे ते समान लेखले जातात. त्याचप्रमाणे सहकार म्हणजे ज्यामध्ये सर्वांचे सहकार्य असते त्यात गरीब श्रीमंत हा भेदभाव नाही. “सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्य करवावहै!” हे सुत्र वैदिक धर्माने घालून दिले आहे व सर्व धर्मात हे या ना त्या रूपात सांगितले असते, हे सूत्र सहकारात तंतोतंत पाळले तर समाज विकास ही फार दूरवरची गोष्ट असणार नाही, त्या समाजाचा विकास होणारच आहे. सहकारी चळवळ हि लोकशाहिची चळवळ आहे. सर्व निर्णय चर्चेने होणे आवश्यक असते. चर्चा याचा अर्थ आपलेच खरे बाकी सर्व चूक अशा अर्थाची नसावी. चर्चेमुळे जो चांगला कार्यभाग साधावयाचा आहे तो अशा वृत्तीमुळे कधीच साध्य होणार नाही, चर्चा म्हणजे चढाओढ नव्हे. |
|
|
|
|